सारथी ला स्वायता प्रदान न केल्यास मंत्र्यांना घेरावा

सारथी ला स्वायता प्रदान न केल्यास मंत्र्यांना घेरावा घालण्याचे आंदोलन करण्याचा  अखिल भारतीय मराठा महासंघाचे अकोले चा इशारा
     संभाजीराजे दहातोंडे च्या नेतृत्वाखाली करणार आंदोलन
  अकोले (प्रतिनिधी ) राज्यामधील मराठा समाजातील तरुणांच्या शैक्षणिक, आर्थिक व समाजीक उन्नतीसाठी सुरू असलेली छत्रपती शाहु महाराज संशोधन व मानव विकास संस्था (सारथी) बंद करण्याचा निर्णय त्वरित मागे घेऊन सारथी ला स्वायता प्रदान न केल्यास मंत्र्यांना घेरावा घालण्याचे आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अकोले शाखेच्या वतीने देण्यात आला आहे.
        महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सारथी ही संस्था महाराष्ट्र चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतीने मराठा कुणबी समाजातील तरुणांना शैक्षणिक फायदा होवा यासाठी सुरू केली मात्र आता लाभ मिळू नये असे प्रयत्न सुुरु आहेत. हा राज्यातील मराठा कुणबी शेतकरी, कष्टकरी, कामगारांवर अन्याय आहे. गेल्या ९ महिन्यापासून संस्थेचे कामकाज व्यवस्थित चालू होते.
       सारथी संस्था सुरु होऊन दहा महिन्याचा कालावधीमध्ये युपीएससी नवी दिल्ली येथे नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये २५० मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना प्रायोजित केले. प्रत्येकी कोचिंग शुल्क  दीड लाख ते दोन लाख रुपये व विद्यावेतन रु. तेरा हजार रुपये  दरमहा “सारथी”कडून देण्यात येत आहे. आयबीपीएस  बँकिग सेवा परीक्षेसाठी राज्यात “सारथी” मार्फत बारा ठिकाणी ५८६ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. तर एमफील आणि पीएचडी करिता ५०३ विद्यार्थ्यांना फेलोशिप, दरमहा ३१ हजार ते  ३५ हजार रुपये व त्या व्यतिरिक्त युजीसी प्रमाणे लाभ मिळतो. एमइएससीओ कोल्हापूर द्वारे मिलीटरी, पॅरा मिलीटरी फोर्समध्ये भरतीसाठी दोन वर्ष निवासी नियमित अभ्यासक्रमाकरिता हे प्रशिक्षण अभ्यासाचा, निवास, संशोधन कार्यपध्दती द्वारे ५५८ विद्यार्थ्यांना कोचिंग पूर्ण ज्युडिशिअल सर्व्हिसेस स्पर्धा परीक्षा तयारीसाठी “बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा”च्या सहकार्याने २०० उमेदवारांचे कोचिंग क्लास सुरु असून एमपीएससी साठी पुणे येथे १२५ विद्यार्थ्यांना नामांकित कोचिंग इन्स्टीट्यूटद्वारे कोचिंग सुरु आहे. कोचिंग फी प्रत्येक विद्यार्थ्यांची सुमारे सव्वा लाख ते दिड लाख व दरमहा नऊ हजार रुपये स्टायपेंङ मिळत आहे. 
        मात्र २१ नोव्हेबर २०१९ च्या आदेशानुसार मराठा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उपक्रमावर संस्थेतून खर्च करण्याला मनाई केली आहे. ३ डिसेंबर २०१९ रोजी अध्यादेश काढून संस्थेच्या कारभारातील स्वायत्तेवर घाला घालण्यात आला आहे. मुळात मराठा समाजातील शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या मुलांना लाभ मिळू नये म्हणून संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. विधानसभा, विधान परिषदेतही हा प्रश्न उपस्थित झाला आहे. संस्था बंद पाडण्याचा घाट म्हणजे मुळात हा राज्यातील मराठा शेतकरी, कष्टकरी वर्गावर अन्याय आहे. आपण याबाबत गांभिर्याने घेऊन तातडीने सारथी संस्थेचे कामकाज पुर्ववत सुरळीत सुरु करावे. 
     आठ दिवसात संस्था सुरळीत झाली नाही तर राज्यातील शेतकरी मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंत्रीमंडळ बैठकी दिवशी मंत्र्यांना घेराव घालण्याचे अंदोलन शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली करतील. यशिवाय राज्यभर शेतकरी मराठा महासंघ अंदोलन उभारेल असा इशारा मराठा महासंघाचे अकोले शाखेच्या वतीने राज गवांदे, भाऊसाहेब वाकचौरे, शिवाजी पाटोळे, शिवाजी कदम, ओम काळे, सौ वर्षाताई चौधरी,अक्षय अभाळे, अमोल मोरे, कैलास जाधव, सूर्यभान गोर्डे, अशोक आवारी, किशोर धुमाळ, सुशांत वाकचौरे,बाळासाहेब कोकाटे, मिलिंद हुलावळे, बाळासाहेब पवार, ईश्वर वाकचौरे, नितीन ढगे, शंकर उगले, सुभाष देशमुख, निलेश गवांदे, सागर फापाळे, कुलदीप देशमाने यांनी दिला आहे.

Comments